पोस्ट्स

नोव्हेंबर, २००९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाऊस

थांब जरा तू बरसू नकोस ती येणार आहे तु ही तरासू नकोस तू बरासलस तर ती अडकून बसेल तू थांबावा म्हणून माझे पत्र ती हातात घट्ट पकडून बसेल काही क्षण तुझ्या थांबण्याची .. मग ती…ती वाट पाहील निघेल मग पावसात ती सावरत सावरत ती माझ्या कडे येईल ती आल्यावर मग शांतच राहील कदाचित ओढणिने चेहरा पुसत, थंडीने कूडकुडत म्हणेल “माफ कर.मला उशीर झाला मी निघालेच होते पण पाऊस आला” मी माझा जॅकेट तिला देईल, ती म्हणेल नको रे मी ठीक आहे. हळूच मी तिचा हात हातात घेईल, मी म्हणेल या बरसनाया पावसाप्रमाणे तू माझ जिवनात सुख होऊन बरसशील ? तिला खूप आनंद होईल.ती लाजेल ही थोडीशी पण हळूच डोळ्यात तिच्या आसवे येतील कदाचित, घरचे काय म्हणतील हा विचार तिला पडेल. माझे जॅकेट मला परत करून. निशब्द होऊन निघून जाईल ती निशब्द मला करून तोडून जाईल ती “”तू थांबू नको रे पावसा तू बरसतच रहा ती नाही आली तरी चालेल मला तिच्या नकारा पेक्षा … ती तुझ्या मूळे नाही आली असे खोट खोट.. मनाला समजावन आवडेल मला….”" तू थांबू नको रे तू बरसतच रहा ..........

Tu......

काय चाललंय तरी काय हे कळायला मार्ग असावा लागतो .... आजकाल तर होश यायला किंवा बेहोश व्हायला तुझा चेहरा दिसावा लागतो .... ए, खरंच तुझ्या आठवणीत मला वेड लागेल काय? आणि माला वेड लागलेलं तुला चालेल काय? तुझ्या आठवांना हेवा वाटावा असं काही करून जा नेहमीच तुझी आठवण येते कधी तू ही येउन जा ... तुझ्या आठवांचा लळा जपतो आहे मनापासून एक आसवांचा झरा झरतो आहे मनापासून .....

असाच आहे मी...

असाच आहे मी... चांदण्यांबरोबर रात्री गप्पा मारणारा वाऱ्याबरोबर दुर फिरायला जाणारा हिरव्या सावलीत कोठेतरी रमलेला असाच आहे मी कवितेतल्या चारओळीत कोठेतरी हरवलेला मला मी सांगू कसा वाटतो थेंब थेंब जसा रोज साठतो शब्दास शब्द, हाकेस हाक, कधी नि:स्तब्ध राहतो जीवनपूजेचा रोज असा मी प्रसाद वाटतो टाळीला जेव्हा टाळीही मी देतो खांद्यालाही खांदा सहज मी जुळवतो, कमवून मित्र अनेक, कधी एक गमवतो तेव्हा ओढ्यात बसून डबक्यात पाहतो मला मी सांगू असा वाटतो ... कधी कुणी भावनांचा वसंतही देतो तरी पालवी न फुटता, मी मैत्रीतच खुजतो कधी डोळ्यात नकार साचतोच फार तेव्हा बरसूनी, इंद्रधनु दिसल्याचा आव आणतो मला मी सांगू असा वाटतो ... रोज स्वप्नांच्या यादीसवे मी निघतो काही गाठतो,काही खोडतो,काही पुन्हा लिहीतो आणि सायंकाळी मात्र मी एकटाच उरतो.... अरे कारण तो एकांतही मला उपभोगायचा असतो...आणि काय... आणि खरच असाच आहे मी...

म्हणून तर बघा - I LOVE YOU ...

कोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधी बदलून जातं आपलं सारं जगच त्यांच्याभोवती फिरू लागतं जिवंत राहणं आणि एक एक क्षण जगणं यातला फरक समजू लागतो नाही नाही म्हणता आपणही प्रेमात पडू लागतो कधी हसणं विसरून गेलो तर ते हसायला शिकवतात जीवन हे खऱ्या अर्थाने जगायला शिकवतात पण एक दिवस जेव्हा ते दूर निघून जातात.... आपलं आयुष्यच अर्थशून्य वाटू लागतं त्यांच्या गोड आठवणींमधे वेडं मन झुरू लागतं कारण प्रत्येकालाच गरज असते एका साथीदाराची, प्रत्येक क्षणाला प्रीतीच्या रंगात रंगवण्यासाठी त्याच्या गोड गुलाबी स्वप्नात हरवण्यासाठी म्हणूनच ........ असेल जर कोणी असं खास तुमच्याजवळ जाऊ देऊ नका त्यांना कधी दूर एकदा जवळ घेऊन म्हणून तर बघा " I LOVE YOU "
इमेज