पोस्ट्स

स्वप्न

आज प्रथमच तिला पहिल मन वेडावुनच गेल, एकाच नजरेत तिने मला पुरत घायाळ केल, गुलाबी गाल... हरीणिची ती चाल मादक अशी तिची अदा, काय सांगू मित्रांनो... मी झालोय तिच्यावर फ़िदा, एकटक पाहत बसलो विसरून सर्व भान, मिळताच नजरेला नजर तिने खाली घातली मान, तिच्याजवळ बोलायची इच्छा खुप झाली, कसलाही विचार न करता सरळ तिचीच वाट धरली, तीही थोडीशी पुढे आली कदाचित तिलाही काही बोलायच होत, काय सांगू मित्रांनो.... नेमक तेव्हाच आईने जागवल होत...

मनातले शब्द मनातच राहून गेले..

मनातले शब्द मनातच राहून गेले... तीला बोलावलं भेटायला, ठरवलं सारे सांगून टाकायचे, पण ती आली मैत्रिणी सोबत, अन काही बोलताच नाही आले, आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले... हिम्मत साठवली आणि केले तीला SMS, पण अर्धवटच वाचून ते Delete तीने केले, आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले... लिहित बसलो रात्रभर, वाटल सांगावं कवितेतून तीला सारं, पण ती समोर येता सारे शब्दच विसरून गेले, आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले... भेटली एकटी बस-स्टॉपवर ती, वाटलं संधी चांगली आहे, पण अचनक तिने "हा मझा बॉय-फ्रेंड" असे इंट्रोड्युस "त्याला" केले, आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले... तरी वाटलं डोळ्यातले अश्रू सांगतील तिला सारं, पण ती येई पर्यंत ते ही पावसाच्या पाण्यात वाहून गेले, आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले..

गांधीजी Vs सावरकर

गांधीजी - भारतवासीयांनो शत्रूवर प्रेम करा व त्याच्यावर विश्वास ठेवा. सावरकर - शत्रूवर प्रेम अथवा विश्वास ठेवला जात नाही. गांधीजी - अहिंसेचा मार्ग स्वीकारा. कोणी एका गालावर थोबाडीत मारली तर दुसरा गाल पुढे करा. सावरकर - स्वरक्षण करणे म्हणजे हिंसा नव्हे. मूर्ख हिंदूंनो, एक गळा कापला तर कापायला दुसरा गळाच उरत नाही. गांधीजी - मी पण एक हिंदू आहे व हिंदूंचे सर्व देव शांतीचा संदेश देतात. सावरकर - तुम्ही पोकळ हिंदू आहात. रामाच्या हातात धनुष्यबाण व कृष्णाच्या हातात सुदर्शन चक्र आहे. सज्जनांच्या रक्षणासाठी देवांनाही हाती शस्त्र घ्यावे लागते. गांधीजी - हाती शस्त्र घेणे कधीही वाईट होय. शत्रूशी लढायचे असेल तर त्याच्या तत्त्वांशी लढा. सावरकर - युद्धात तत्त्व नव्हे तर तलवारी टिकतात व जिंकतात. राष्ट्राच्या सीमा या फक्त तलवारीनेच आखता येतात, तत्त्वांनी नव्हे. गांधीजी - हृदयपरिवर्तनावर विश्वास ठेवा. शत्रूचे मन जिंका. सावरकर - ज्याने आपल्याला मारून टाकायचे ठरवले आहे त्याचे मन जिंकता येत नाही. हे हिंदूंनो, अफझलखानाचे हृदय परिवर्तन करता येत नाही, त्याचे ह्यदय फोडावे लागते.

इतकी नाजुक

इतकी नाजुक इतकी अल्लद ............... इतकी नाजुक इतकी अल्लद ........ फ़ुलपाखराहुन अलवार ............ चालु बघत नकळत होते वारया वरती अलगद स्वार इतकी नाजुक ...... निजल्या देही गव्हाषातुनी चंद्र किरण ते पडता चार लख्खगोरटी रापुन झाली रात्रीत एका सावळ नार इतकी नाजुक जरा तिचे मी जोर देउनी लिहीता नाव दावत आली दुसरया दिवशी अंगाअंगावर हळवे घाव इतकी नाजुक ..... इतकी नाजुक इतकी सुंदर दर्पण देखील खुळावतो ...... ती गेल्यावरही तो क्शणभर प्रतिबिंबाला धरु बघतो ... इतकी नाजुक कि जेव्हा ती पावसात जाऊ बघते ....... भिती वाटते कारण जळात साखर क्शणात विरघळते . इतकी नाजुक कि आता तर स्मरणाचे ही भय वाटे ...... नको रुताया फ़ुलास असल्या माझ्या जगण्यातील काटे ----- संदिप खरे

कणा

ओळखलत का सर मला - पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहुन ; गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहुन माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी - बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विझली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर , आता लढलो आहे पडकी भिंत बांधतो आहे . चिखलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला ’ पॆसे नको सर , जरा एकटेपणा वाटला ’ मोडून पडला संसार तरी मोडला नाही ’ कणा ’, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा ....         कुसुमाग्रज.......

मराठी असे आमुची मायबोली

मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे नसो आज ऐश्वर्य या माउलीला यशाची पुढें दिव्य आशा असे जरी पंचखंडांतही मान्यता घे स्वसत्ताबळें श्रीमती इंग्रजी मराठी भिकारीण झाली तरीही कुशीचा तिच्या , तीस केवीं त्याजी जरी मान्यता आज हिंदीस देई उदेलें नवें राष्ट्र हें हिंदवी मनाचे मराठे मराठीस ध्याती हिची जाणुनी योग्यता थोरवी ; असूं दूर पेशावरीं , उत्तरीं वा असूं दक्षिणीं दूर तंजावरीं , मराठी असे आमुची मायबोली , अहो ज्ञानदेवीच देखा खरी मराठी असे आमुची मायबोली जरी भिन्नधर्मानुयायी असूं पुरी बाणली बंधुता अंतरंगी , हिच्या एक ताटांत आम्ही बसूं हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडूं वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरी जगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापे हिला बैसवूं वैभवाच्या शिरीं हिच्या लक्तरांची असे लाज आम्हा , नका फक्त पाहू हिच्या लक्तरां प्रभावी हिचे रूप चापल्य देखा पडावी फिकी ज्यापुढे अप्सरा न घालू जरी वाङ्‌मयातील उंची हिरे मोतियांचे हिला दगिने ’ मराठी असे आमुची मायबोली ’, वृथा ही बढाई सुकार्याविणें मराठी असे आमुची मायबोली अहो पारतंत्र्यात ही खंगली ...

असं असतं प्रेम

एका डॉक्टरांकडे एक ८० - ८५ वर्षांचे म्हातारे गृहस्थ आपल्या जखमेचे टाके काढून घ्यायला गेले . सकाळी ८ . ३० चा सुमार . ते डॉक्टरांना म्हणाले , थोडं लवकर होईल का काम ? मला ९ वाजता एकीकडे जायचंय . डॉक्टरांसमोर त्या क्षणी काहीच काम नव्हतं . त्यांनी जखम तपासली , सामानाची जमवाजमव केली आणि टाके काढायची तयारी केली . दरम्यान , ते त्या गृहस्थाशी गप्पा मारत होते . "" आजोबा , ९ वाजता दुसऱ्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे का ?'' "" नाही ! मला ९ वाजता माझ्या बायकोबरोबर नाश्ता करायला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जायचंय .'' "" हॉस्पिटलमध्ये ? आजारी आहेत का त्या ?'' "" हो ! गेली पाच वर्षे हॉस्पिटलमध्येच आहे ती .'' "" अच्छा ! आणि तुम्ही वेळेवर गेला नाहीत , तर वाट पाहतील ना त्या ? काळजीही करतील ...?'' "" नाही डॉक्टर . तिला " अल्झायमर्स ' झालाय . ती गेली पाच वर्षे कोणालाच ओळखत नाही .'' आजोबा शांतपणे म्हणाले . डॉक्टर चकित होऊन म्हणाले , "" आणि तरीही तुम्ही रोज त्यांच्याबरोबर नाश्ता ...