पोस्ट्स

जून, २००९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तुमचं दु:ख खरं आहे....

तुमचं दु : ख खरं आहे .... कळतं मला , शपथ सांगतो , तुमच्याइतकंच छळतं मला ; पण आज माझ्यासाठी सगळं सगळं विसरायचं , आपण आपलं चांदणं होऊन अंगणभर पसरायचं . सूर तर आहेतच ; आपण फक्त झुलायचं , मन मोकळं , अगदी मोकळं करायचं , पाखरू होऊन पाखराशी बोलायचं . आयुष्यात काय केवळ काटेरी डंख आहेत ? डोळे उघडून पहा तरी ; प्रत्येकाला फुलपाखराचे पंख आहेत ! हिरव्या रानात , पिवळ्या उन्हात जीव उधळून भुलायचं ! मन मोकळं , अगदी मोकळं करायचं , पाखरू होऊन पाखराशी बोलायचं . प्रत्येकाच्या मनात एक गोड गोड गुपीत असतं , दरवळणारं अत्तर जसं इवल्याश्या कुपीत असतं ! आतून आतून फुलत फुलत विश्वासाने चालायचं , मन मोकळं , अगदी मोकळं करायचं , पाखरू होऊन पाखराशी बोलायचं . आपण असतो आपली धून , गात रहा ; आपण असतो आपला पाऊस , न्हात रहा . झुळझुळणार् या झर् याला मनापासून ताल द्या ; मुका घ्यायला फूल आलं त्याला आपले गाल द्या ! इवल्या इवल्या थेंबावर सगळं आभाळ तोलायचं , मन मोकळं , अगदी मोकळं करायचं , पाखरू होऊन पाखराशी बोलायचं . ‍‍

तुझी आठवण आता येत नाही मला

तुझी आठवण आता येत नाही मला तुलाही मी आता आठवत नसेन तरीही पाऊस पडला की बाहेर बघ मी तुझीच वाट पाहत असेन पावसात तुला दिसणार नाहीत अश्रू अलगद जेव्हा मी तुझ्याजवळ बसेन आठवतील मग मला तुझे शब्द राग येऊन मग मी तुझ्यावर रुसेन आनंदात मग मी तू भेटल्यावर माझे डोळे हलकेच पुसेन तु विसरु शकणार नाहीस कलंडता सुर्य , लवंडती सांज पक्षांच्या माळा , किणकिणती सांज तु विसरु शकणार नाहीस सोनेरी उन , वा-याची धुन पावलांची चाहूल , ओळखीची खुण तु विसरु शकणार नाहीस दिलेला शब्द , ओझरता स्पर्श दडलेले प्रेम , ओसंडता हर्ष तु विसरु शकणार नाहीस भिजलेले डोळे , विरलेली स्वप्नं भिजलेली वाट , उरलेले प्रश्न तु विसरु शकणार नाहीस आणि मी ही विसरु शकणार नाही संध्याकाळ जवळ आली की............ संध्याकाळ जवळ आली की माझं असं होतं तुझी आठवण दाटून येते आणि मन पिसं होतं माणसांमध्ये असुनसुध्दा मी अगदी एकता असतो

तरीही ..... त्या दिवशी 'तो ' बरसलाच नाही

तरीही ..... त्या दिवशी ' तो ' बरसलाच नाही भरून आलेल्या आभाळात ढगही वाट पाही तरीही ..... त्या दिवशी ' तो ' बरसलाच नाही होत होता त्या दिवशी ढगांचा गडगडाट थांबत नव्हता त्या दिवशी विजांचा कडकडाट मोरही त्या दिवशी फुलवू लागले पिसारा सुर्यानेही आवरून घेतला किरणांचा पसारा ढगांकडेही त्या वेळी दुसरा पर्यायच नव्हता काही तरीही ..... त्या दिवशी ' तो ' बरसलाच नाही एके दिवशी माझ्या डोळ्यातच आभाळ आल मनामध्ये दाटलेल्या भावनांच वादळ झाल त्या दिवशी मी कशातच रमत नव्हतो सगळ्यांमध्ये असून सुध्दा कुणाशीच बोलत नव्हतो डोळे झाले ओले , पापणीही अश्रूंनी जड होत जाई तरीही ..... त्या दिवशी ' तो ' बरसलाच नाही चान्दण स्वच्छ सफेद , पोर्णिमेची रात्र सजलेली मिलना साठी आतुर ' ती ' त्याच्या साठी नखशिकांत नटलेली प्रेमाचे सारेच भाव तिच्या हृदयातून उमलत होते त्याचे ही डोळे तिला असेच काहीतरी सांगत होते तिलाही होतीच अश्या एका तृप्त रात्रीची घाई तरीही ..... त्या दिवशी ' तो ...

दूर निघून जाण्यापूर्वी

दूर निघून जाण्यापूर्वी एवढं तरी कर अंगणात माझ्या घेऊन ये एखादी तरी सर ... तुझ्या सरीनं पुन्हा एकदा भरून जाऊदे अंगण तुझ्या पुरानं पुन्हा एकदा वाहुन जाऊदे कुंपण पसरून माझे हात पुन्हा झेलीन तुझ्या गारा श्वासामध्ये भरून घेईन सळाळणारा वारा ओसरून जाता सर तुझी दूर निघून जाशील ओल्याचिंब तुझ्या आठवणी मागे ठेऊन जाशील जेंव्हा जेंव्हा आठवेल तुझी दुरावलेली सर आठवणींचा पाऊस येईल भिजवून जाईल घर ....

ती जाताना 'येते' म्हणून गेली....

ती जाताना ' येते ' म्हणून गेली अन जगण्याचे कारण बनून गेली! म्हटली मजला ' मनात काही नाही ' पण जाताना मागे बघून गेली! तिच्या खुणेची चंद्रकोर ही गाली वार नखाचा हलके करून गेली... घडे क्षणांचे रिते असे केले की देहसुखाचा प्याला भरून गेली कळते हा बगिचा का फुलला माझा काल म्हणे ती दारावरून गेली! तसे पाहता पाउस तितका नव्हता कळे न का ती इतकी भिजून गेली... तिच्या भोवती गंध अता दरवळतो ( सहवासचे अत्तर टिपून गेली!)

मी तिच्यात....... नव्हतो पण ती माझ्यात होती.......

मी तिच्यात नव्हतो पण ती माझ्यात होती तीची नव्हती कधी पण माझी साथ होती मी आजवर कदीलांच्या उजेडात जगलो ती चमकणा-या ता-यांच्या प्रकाशात होती तीचा प्रवास होता मोठ्या महामार्गावरचा माझी ती बिचारी लहान पायवाट होती तिच्या स्वप्नांना दोरखडं जखडलेले नेहमी माझी कधीही सुटणारी निसरति गाठ होती तीच सुखांशी नेहमी अजोड नातं गुफ़लेल माझ्या वाट्याला दुःखंच भरमसाठ होती. नेहमी साखर झोपेची तिची पहाट रोजची मी डोळे मिटले नाही माझी सदा पहाट होती. तिच्या ओठी नेहमी हसु उमलायच सुखाच माझ्या डोळ्यानां नेहमी आसवांची साथ होती तिने कधी हात जोडले नाहीत कशासाठी देवापुढे तीच्यासाठी देवळात नेहमी माझीच वरात होती आज म्हणतेय मी चुकली पण काय फ़ायदा खरच फ़ार उशीरा तीची ही साद होती. मी स्मशांन वाटेवर असताना तिला कळालप्रेम

सर तुम्हीच सांगितले होते ना,

सर तुम्हीच सांगितले होते ना, जा आणि तिच्या कडून notes घे….. शिकवले नाही तर काय झाले? notes वाचून परीक्षा दे….. म्हणून गेलो, नी खड्ड्यात पडलो कणा मोडला पण प्रेमात पडलो…. तिला फक्त ‘देतेस का?’ विचारले…. माहीत नाही , तिच्यावर का आभाळ कोसळले?…. notes एवजी तिने frdship असा अर्थ घेतला…. (नी पुढे बोलायाच्या आतच ) एक धक्का जोरात दिला….. पडलो एकदाचा खड्ड्यात, आणि मोडला माझा कणा…. पण काहीही असो सर, परत एकदा लढ म्हणा…. मी तर म्हणतो सर, तुम्ही कधी शिकउच नका… notes ‘परत आण’ म्हणायला, जराही कचकू नका….

हलकेच पचोळ्याच आवाज होतो..

हलकेच पचोळ्याच आवाज होतो.. तुझी चाहूल लगते तू दिसली नाहीस की खूप उदास वाटतं अखंड जग जरी सोबतीला असल तरी सुद्धा अगदी एकट का सारखा तुझा आभास? एकटा असले तरी तुझाच विचार करतो तुझ्यावरच कविता सुचते तू आली नाहीस लवकर की मन बेचैन होतं पुस्तकांचा ढीग जरी सोबत असला तरीसुद्धा लक्ष्य तुझ्याकडे असतं का नेहमीच तुझ्याकडे वाट? रुसतेस तू माझ्यावर जेव्हा गळून जाते, दोर तुटलेल्या पतंगासरखी माझच मन मला खातं तू धावत येउन मिठीत घ्यावस अस सारख वाटत राहतं का निरंतर तुझीच आस? त्या टेकडी जवळ्च्या डोहात जेव्हा मी माझ प्रतिबिंबा पाहते तू मागून माला बिलगलास असा भास होतो नकळत चेहरयवरल हसू पाहून माझीच माला लाज वाटते का सारखा तुझा भास्?

पाउस..!

खिडकीपाशी तुझ्या किती घुटमळला पाउस..! छत्री घेऊन निघता तू हळहळला पाउस..! मला न सुचले बोलायाला तेव्हा हसला. तुझ्यापुढे अन स्वतः किती अडखळला पाउस..! कधी उगाचच रुसला, क्षितीजामागे दडला. मल्हाराने तुझ्या पुन्हा विरघळला पाउस..! अवचित ओल्याचिंब स्मृतींची वीज तळपली. रक्तासोबत धमन्यांतुन सळसळला पाउस..! कधी सरीतून निघता जखमांवरची खपली. स्वतःच त्या जखमांसाठी तळमळला पाउस..! तुझ्या अंगणी शब्दशब्द हा आज बरसला. कितीकदा मी लिहिला अन चुरगळला पाउस..!

आयुष्यात पहिल्यादा कोणीतरी मनापासुन आवडल होत

आयुष्यात पहिल्यादा कोणीतरी मनापासुन आवडल होत खरच तिच्यावर मी मनापासुन प़ेम केल होत पहिले आम्हा दोघांमध्ये फक्त मैत्रीच नात होत नंतर मात्र तिच वागण बोलण मला आवडत गेल होत एके दिवशी सकाळी तिला माझी बनशील का अस विचारल होत तिने मात्र उत्तर न देताच निघण पसंत केल होत दोन दिवसांनी मात्र तिने उत्तर नाही अस दिल होत मैत्रीच नात मात्र पुढे चालु ठेवीन अस सांगितल होत हळु हळु मात्र तिच्या मैत्रीच गोड विष प्याव लागत होत विसरता येत नाही म्हणुन मैत्रीवर समाधान मानाव लागत होत नंतर मात्र आयुष्य संपवावस वाटत होत पण तिला दोष लागेल म्हणुन तेही जगाव लागत होत इतरांसाठी मात्र माझ प़ेम एकतफी॔ होत पण मी मात्र तिच्यासाठी प़ेम साठवुन ठेवल होत

नेहमीचाच पाऊस तसा..आज वेगळा वाटला....

नेहमीचाच पाऊस तसा..आज वेगळा वाटला.... कोरड्या झालेल्या मातीत....नाच नाच नाचला.... तेच थेंब,तेच पाणी... पावसावरचीही तीच गाणी.... गाण्यातला सुर जरा तेवढा.... एकटा एकटा वाटला.... नेहमीचाच पाऊस तसा..आज वेगळा वाटला.... पाण्यातुन वाहणारी कागदाची होडी.... वाफाळलेला कपातील चहाची गोडी... कप जुना तसाच... मात्र.... चहातलाच गोडवा आटला...... नेहमीचाच पाऊस तसा..आज वेगळा वाटला.... रस्त्यावरचा नकोसा चिखल सारा..... घरा-घरात घुसणारा सोसाटयाचा वारा... घरं अगदी तशीच उभी.... वाराच कसा दिशा भरकटला..... नेहमीचाच पाऊस तसा..आज वेगळा वाटला.... पावसामुळेच काय ते.. प्रेम-बिम जमलं होत...... एका हाताने.... दुस-या हाताला हळुच हातात घेतलं होत...... प्रेम कधीचच संपल.... कारण हातच कायमचा सुटला..... नेहमीचाच पाऊस तसा..आज वेगळा वाटला.... अश्रुंना तुझ्या या आवर रे आता.... दु:खातुन तु जरा सावर रे आता.... अश्रु कधीचेच आटले हो.... एक थेंब फक्त्त डोळ्यात साचला..... नेहमीचाच पाऊस तसा..आज वेगळा वाटला....

दिसते तसे नसते हे खरेच आहे

दिसते तसे नसते हे खरेच आहे , मराठ्यांच्या ताकदीचा हा फ़क्त ट्रेलर आहे , खरा पिक्चर तर अजुन बाकीच आहे , महाराष्ट्र काबीज करण्याचा , कितीही प्रयत्न करा तुम्ही , पण लक्षात ठेवा, 'राज'राज्य आल्यावरती , तुमची काही धडगत नाही , वेडे तुम्हास वाटलो आम्ही , तर हो आम्ही आहोत वेडे , कारण म्हनटले आहे थोर पुरुषांनी , की, इतिहास घडवितात ती वेडी माणसेच , मस्तवाल राजकार्न्याना , महाराष्ट्राचा एकच सवाल आहे , कुणा-कुणावर बंदी घालणार , मना-मनात 'राज' आहे , मना-मनात 'राज' आहे .

कॉलेजमध्ये असताना.......

कॉलेजमध्ये असताना एक मुलगी मला आवडली तुम्हाला सांगतो ती इतकी आवडली ना कि चोहिकडे मला फक्त तिच दिसू लागली.. वेळ वाया जात आहे किती तिला मनातले सांगेनच ह्याची नाही शाश्वती पण मनात होती भीती म्हणाली असती मित्रा, हे तर होतय फारच अति कॉलेज संपले नोकरी सुरू झाली तसा थोडा तिचा विसर पडला अन अहो भाग्य!! आज ति चक्क समोर आली आली होती माझ्या कंपनीमध्ये मुलाखत देण्यास आणि मि होतो तिथे तिची मुलाखत घेण्यास मुलाखत सोडली आणि गेलो कॉफी प्यायला विचारले तिला आहेस एकटी कि आहे कोणी तुझा दादला..? तिचा बोलका चेहरा सर्व काही सांगून गेला जणू चातकाचा कौल पावसाने स्विकारला तो चेहरा माझी ओढ अजुनच वाढवून गेला आणि माझ्या मनाचा मोर पिसारा फुलवून तिथेच नाचू लागला. मनाने पुढाकार घेतला आणि वाणिने त्यास प्रतिसाद दिला एकदा सांगितले तिला माझ्या मनातले आणि केले इतक्या वर्षाचे अस्वस्थ मन मोकळे.. ति हलकेच लाजली आणि तिच्या गालावरील खळी माझ्या अंतर्मनाने ओळखली ति म्हणाली किती वेळ लावलास तु...? कॉलेजमध्ये असताना मला पण आवडत होतास तु... अरे नशिबा कसला हा खेळ खेळलास युगान युग दुर ठेवून शेवटी आम्हास मिळवलास म्हणतात ना - जोड्या ह्य...

म्हणून त्या कविता मी परत वाचत नाही...!

म्हणून त्या कविता मी परत वाचत नाही...! निजण्याआधी तुज्यावर कविता करायच्या हे तर आता रोजचंच झालंय आणि याची कितीही सवय झाली आहे असं म्हटलं तरी प्रत्येक वेळेस लिहिताना मला भरून आलंय मी कविता का लिहितो हे मला खरंच कळत नाही कारण जिच्यासाठी मी त्या लिहितो तिच्यापर्यंत त्या कधीच पोहोचत नाही आणि मनाची परत घालमेल नको म्हणून मी ही त्या परत वाचत नाही तुला खरं वाटणार नाही पण माझ्या कवितेचा प्रत्येक शब्द माझं काळीज जाळतो तू माझ्या शब्दाकडे नीट पाहिलंस तर तुलाही कळेल की माझा प्रत्येक शब्द मूक अश्रू ढाळतो माझ्या या कविता मला कधीही न सुटलेलं कोडं आहे अफाट दुखः दाबलय मनात कवितेतून बाहेर आलेलं हे फक्त थोडं आहे आज वाटलं की अश्रूंच्या शाईनेच कविता लिहावी तसेही डोळ्यातून ते आज काल आटता-आटत नाही हे ऐकून अश्रूही आज बोलले म्हणाले , मनात घुसमट होते म्हणून बाहेर येतो तर आता तुला तेही पटत नाही

प्रत्येकजण कधी ना कधी एकदातरी प्रेमात पडलेला असतो !!

चंद्र निवडलेला असतो कारण, प्रत्येकजण कधी ना कधी एकदातरी प्रेमात पडलेला असतो !! तिच्या चेहरयाला चंद्र म्हणण्याची त्याची सवय कही मोडलेली नसते तिने कितीही डोळा चुकविला तरिही त्याने जिद्द माञ सोडलेली नसते तीच्या सौंदर्याचं गुणगाण करण्याचा जणू छंदच त्याला जडलेला असतो कारण, प्रत्येकजण कधी ना कधी एकदातरी प्रेमात पडलेला असतो !! पान-टपरी वाल्यांकडे त्याची अगदी महिनो-महिने उधारी असते तरी, तिच्यासाठी चंद्र-तारे आणण्याची त्याची एका पायावर तयारी असते तीच्यासाठी काहीही करण्याचा निर्धार, त्याच्या मनात खोलवर दडलेला असतो कारण, नक्षञांच्या गर्दीत प्रत्येकाने आप-आपला चंद्र निवडलेला असतो !! तिच्यासाठी गुलाब तोडताना तो कधी काट्यांचीही तमा बाळगत नाही आणि ती सोबत असेपर्यंत त्याला, दुःखं कधीच उमगत नाही तिच्या क्षणभर दुराव्यानेही, तो दुःख सागरत बुडालेला असतो कारण, नक्षञांच्या गर्दीत प्रत्येकाने आप -आपला चंद्र निवडलेला असतो !! बरं यालाच प्रेम म्हणावे तर, लोक निर्मळ प्रेमाची भाषा करतात आणि नुकतचं प्रेमात पडलेल्या त्या दोघांकडून अगदी शुध्द प्रेमाची आशा करता

माझी ती अशी असावी...

माझी ती अशी असावी... माझी ती अशी असावी... माझी ती अशी असावी, जगात दूसरी तशी नसावी, मलाच सर्वस्व माननारी, माझी ती अशी असावी ll १ ll प्रानजळ असावी, अवखळ असावी, परी ती अगदी सोज्वळ असावी, सर्वांना अगदी आपलं माननारी, माझी ती अशी असावी ll २ ll फारच सुंदर, फारच गोरी, फारच देखणी पण नसावी, मजवर भरपूर प्रेम करणारी, माझी ती अशी असावी ll ३ ll आपली माणसं, आपलं घर, आपलेपणा जपणारी असावी, ससूलाही आई म्हणनारी, माझी ती अशी असावी ll ४ ll चाणाक्ष, हुशार, व्यवहारी, आयुष्यातील सल्लागार व्हावी, माझ्या चुका लक्षात घेणारी, माझी ती अशी असावी ll ५ ll माया, प्रेम आपुलकी, हे सर्व देणारी असावी, माझी ती कशी असावी? माझी ती अशी असावी ल ६ ll

कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

कुणाला कुणी असं सोडुन का जातं ? मनाशी मनं आधी जुळवायची कशाला ? जुळलेली मनं पायदळी मग तुडवायची कशाला ? कधि फ़ुलपाखरु होऊन बागडणा - या मनास काट्यांतच मग खुडावं लागतं ..... कुणाला कुणी असं सोडुन का जातं ? होऊन चांदणं आपल्यावर कुणी बरसुन घेतं बरसतानाच नकळत हरवुनही जातं भर चांदरातीही मनास मग एकट्यालाच झुरावं लागतं ... कुणाला कुणी असं सोडुन का जातं ? कुणास कुणी कधि आपलं म्हणु नये झालात कुणाचे कधि तर दुर जाउ नये वाळवंटी या जगात एकट्यालाच मग जगावं लागतं ... कुणाला कुणी असं सोडुन का जातं ? मी जगुन घेतो एकटा माझ्याशीच मी हसुन घेतो एकटा तरी एकट्यालाच रोज रोज मला मरावचं लागतं ... कुणाला कुणी असं सोडुन का जातं ??? By------ Manasi.... J -----