पोस्ट्स

ऑक्टोबर, २००८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दिपावलीच्या मंगलमय शुभेच्छा

चकली खाईन कडाम कुडुम......!! तडम तुडुम तडम तुडुम चकली खाईन कडाम कुडुम......!! दोनच दात.......पण खायची घाई नीट घास रे......अशी ओरडते आई......!! बेसन लाडू किती छान रव्याचा लाडू गोरा गोरा पान.......!!  करंजी शेव ची जमली गट्टी  विसरा गृहपाठ.......शालेला पडली सुट्टी.....!! चिवडा शंकरपाली मस्त मजा अनारसा म्हणजे दिवालीचा राजा.......!! भुईचक्र अनार फुलबाजा.......मजा येईल छान उटण्याची आंघोळ करून ज़रा होइन गोरा पान........!! बाबांनी आणला आकाश कंदील हात उनचाउन तो दादा दारावर बांधेल.......!! भाऊबिज ला ताई देईल.......गोड़ गोड़ मुका  म्हणेल चला नमस्कार करा........पायावर डोक टेका.......!! छान छान आहे माझी दीवाली....... द्या मला एक चकली.......खाताना जर माझी आठवण आली........!! हाक मारा फ़क्त मला मी धावत येईन........ दोनच दात असले तरी काय झाल....कडाम कुडुम...कडाम कुडुम....चकली खाईन.......!! कडाम कुडुम...कडाम कुडुम....चकली खाईन.......!!  _./'\._¸¸.•¤**¤•.¸.•¤**¤•.¸.•¤**¤•., . *•. .•* दिपावलीच्या मंगलमय शुभेच्छा /.•*•.\ ¸..•¤**¤•.,.•¤**¤•..,.•¤**¤•.,

मी...मी कोण आहे

मी...मी कोण आहे आणि कसा आहे आणि का आहे??हे प्रश्न मोठ-मोठ्या लोकांना निरुत्त्तर करतात..ह्या प्रश्नाना मी काय उत्तर देणार??आफ़ाट पसरलेल्या या भूसागरात,ब्रह्मांडात मी एक शुल्लक ठिपका आहे..एक उर्जाकण,ह्याहून जास्त काही नाही.मी ईथे का आहे..का जगतोय??हे सगळ आधिच ठरलेल आहे..ते जाणण्याची माझ्या बुद्धिची पोच नाही..कधी तरी ते माला कळेल..शेवटी तेच तर शोधण्यासाठी माझा जन्म झाला आहे..मी एकटाच जन्माला आलो.... अणि एकटच पंच महाभुतात विलीन होणार...... ही सगळी नाती, परिवार, सगळ डोळ्यासमोर पसरवण्यात आलेले एक चित्र आहे...... वास्तव नाही.... तुम्ही जगता, सकाळी उठता, श्वास घेता, आजारी पडता हा तुमचा भास आहे..... डोक्यातल्या ज्या अवयवाला आपण मेंदू म्हणतो..... त्यची किमया अपरंपार आहे, त्यात एव्हढी शक्ति दडलेली आहे त्याची कोणालाच कल्पना नाही..... physics मध्ये जे universal constants आहेत ते सत्यात शाश्वत नाही. एक अद्न्यात उर्जा त्यांना बद्धित ठेवते.हीच ती...... mind power...... ती कोणालही नेस्तनाभूत करु शकते नाही तर जीवन दान देवू शकते...... आपण सामान्य लोक ईश्वर म्हणतो..... तो तुमच्यातच लपलेला आहे..... त्याला ...

love is blind

http://in.youtube.com/watch?v=0fjP9o194Uo

आठवण आली तुझी की,

आठवण आली तुझी की, नकळत डोळ्यांत पाणी येतं.. मग आठवतात ते दिवस जिथं आपली ओळख झाली.. आठवण आली तुझी की, माझं मन कासाविस होतं मग त्याच आठवणीना.. मनात घोळवावं लागतं.. आठवण आली तुझी की, वाटतं एकदाच तुला पाहावं अन माझ्या ह्रदयात सामावुन घ्यावं.. पण सलतं मनात ते दुःख.. जाणवतं आहे ते अशक्य… कारण देवानेच नेलयं माझं ते सौख्य… पण तरिही……… आठवण आली तुझी की, देवालाच मागतो मी…. नाही जमलं जे या जन्मी मिळू देत ते पुढच्या जन्मी

स्वर्गाची फालनी.........

इमेज

जेव्हा कोणीच नसतं माझ्याबरोबर हसणारं....

जेव्हा कोणीच नसतं माझ्याबरोबर हसणारं.... माझं दुःख समजून प्रेमाने जवळ घेणारं ... तेव्हा माझ्या कविता माझ्याशी बोलू लागतात, त्याच माझ्याबरोबर हसतात, त्याच माझ्याबरोबर रडतात... धीर देऊन सांगतात.. तू नाहीस एकटी, घेऊन येतात बरोबर खूप साऱ्या आठवणी. आठवणींच्या जगात फिरताना दुःख मनातले विरून जाते, मात्र तिथून परत येताना अंतःकरण जड होते. वास्तवाशी सामना करताना मनाला थोडं समजवावं लागतं... मनातले दुःख लपवून चेहऱ्यावर हसू फुलवावं लागतं !!

रेशमी शब्दांस माझ्या वेदनेचे पीक झाले ....

रेशमी शब्दांस माझ्या वेदनेचे पीक झाले ....   बोलणारे बोलले की सर्व काही ठीक झाले !!   कोणती केली निराशा जीवना आता तुझी मी ?  दाबलेले हुंदकेही आज प्रासंगीक झाले !!   जाळल्या बागा मनाच्या तू जरी लाखो हजारो ..   एवढे मी सोसले की मम् ह्रिदय सोशीक झाले !!   अक्षरे वाचून माझी तू लिहाव्या दोन ओळी ...   "चांगले लिहितोस तू!" हे सांगणे मौखीक झाले !

वडापाव

त्याला वडापाव आवडत नाही   तिला वडापाव आवडतो   तिने वडापावचा हट्ट धरताच   तो सॉलिड भडकतो    अरबट चरबट खाण्यापेक्षा   सुकी भेळ का खात नाहीस   त्याचे असले गोल फंडे   तिला खरंच कळत नाहीत   वडापाव is unhelthy   वडापाव is junk food   वडापाव is tempting   वडापाव tastes so good   वडापाव पोट बिघडवतो   तरीही तु त्याच्यासठी इतकी वेडी   कधी खात तर नाहीस   मग तुला काय कळणार आहे त्यातली गोडी     वडापाव फुकटचं खाणं   काहीतरी आपलं तेलकट उगाच   मन आणि पोट कसं त्रुप्त होऊन जातं   एक वडापाव पोटात जाताच     दरवेळी फिरायला गेल्यावर   दोघांचं हे असं होतं   खाण्यावरुन भांडण होऊन   वेटरसमोर हसं होतं   वडापाव आवडत नसला तरी   पाणीपुरी त्याला आवडते   मग पाणीपुरी तरी healthy कशी   यावर तिही झगडते   चिडुन मग ती रुसुन राहते   फुगून बसते पुरीसारखी   त्याचं तिचं भांडण असं   आंबट गोड चटणीसारखं

ती

मनापासून ती खूप आवडते मला.   तिच्या मनातलं, पण माहीत नाही.   मी दिलेल्या फुलांपैकी एकही फुल.   तिच्या हृद्याच्या वहीत नाही..   श्वासाहून जास्त तिचे विचार येतात.   ती विचारांच्या भानगडीत पडत नाही.   म्हणते "मी भावनांच्या कुशीत गवसते".   पण विचारांच्या मिठीत सापडत नाही..   डोळे तिचचं चित्र रेखाटतात.   तिच्या डोळ्यांचं सांगू शकत नाही.   दिसतो तिथे अधून मधून तसा.   पण काजवा होऊन चमकत नाही..   प्रत्येक स्वप्नात ती हजेरी लावते.   तिच्या स्वप्नांचं सांगता येत नाही.   समुद्राच्या वाळूत घर बांधायला.   अजून तिचं मन तसदी घेत नाही..   कदाचित तिच्या प्रेमात मी बुडतोय.   ती बुडत असेल पटत नाही.   दोघांच्या मनात एकसारखी क्रिया.   घडत असेल असं वाटत नाही..

कळत नकळत

कळत असो व नकळत,  सारे काही घडतच असते;  वेळेच्या आधी अन् नशीबाहून जास्त,  कधीच काही मिळत नसते. ~~~~|| ध्रु ||   असू देत जीवनात कितीही,  अडथळ्यांनी भरलेल्या वादळरूपी वाटा;  प्रयत्ऩ असावे आपले अखंड,  जणू काही सागराच्या लाटा. ~~~~|| १ ||   पडू देत कर्तुत्वावर आपल्या,  कसलीही जळजळीत दुष्ट छाया;  देण्यासाठी दुस-याला आपल्याकडे,  असावी कायम आभाळा एवढी माया. ~~~~|| २ ||   दिसं सरती सूर्य उगवती,  दुनिया गाई आपुले जीवनगाणे;  नक्कीच होऊ आपणही एकदा,  स्वत:च्या स्वप्नातील नक्षत्रांचे देणे....  स्वत:च्या स्वप्नातील नक्षत्रांचे देणे....!!

तू

तू कूठेही असलीस तरी माझ्या जवळ आहॆस  तू कशीही असलीस तरी आजही माझी आहे   फ़रक एवढाच की मी आज तुझा राहीलॊ नाही  माझ्या स्वप्नांत माझ्या विचारात फ़क्त तूच आहॆस  एक सत्य आहॆ मी तूझ्याशिवाय जगू शकत नाही  एक सत्य आहॆ मी तूला तॆ समजवू शकत नाही   मी जगतॊय आजही एक यूदध जिकंण्यासाठी  पण एक सत्य आहॆ मी तूला हरवू शकत नाही  मी आज गप्प आहे कारण तूच बॊलत नाहीस  मी आजही जागा आहॆ कारणं तू झॊपलीस   मला दुःख नाही आज माझ्या हरण्याचं कारणं आज  मी जरी हरलो पण तू तरी जिकंलीस

ती मैत्री......

काही नाती बांधलेली असतात.  ती सगळीच खरी नसतात.  बांधलेली नाती जपावी लागतात.  काही जपून ही पोकळ राहतात.  काही मात्र आपोआप जपली जातात.  कदाचित त्यालाच मैत्री म्हणतात..   जे जोडले जाते ते नाते.  जी जडते ती सवय.  जी थांबते ती ओढ.  जे वाढते ते प्रेम.  जो संपतो तो श्वास.  पण निरंतर राहते ती मैत्री.  फ़क्त मैत्री...........   मोहाच्या नीसटत्या क्षणी.  परावृत्त करते ती मैत्री,.  जीवनातल्या कडूगोड क्षणांना.  निशब्द करते ती मैत्री,.  जीवनाच्या आंतापर्यंत प्रत्येक पावलला.  साथ देते ती मैत्री,.  आणि जी फक्‍त आपली असते,.  ती मैत्री.......

ओळख....

ओळख.... नसतेच कधी कोणाची कोणाशी. ओळख.... नसतेच कोणाला कधी स्वतःची. ओळख.... असल्याचा आव असतो सर्वांशी. ओळख.... मग हीच गत असते सा-यांची. ओळख.... विसरलेत सारे आज अर्थच ह्या शब्दाचा. नाममात्र उरले आहेत आज हे शब्द. ओळख.... बनते कधी ही देखील आजी माजी. म्हणतात ना कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी. ताकाला जाऊन भांडे लपवणारेही बरेच असतात. ईथेही मग उगाच ओळखीचा आव आणतात. स्वार्थ स्वतःचा परमार्थ केल्याचा भासवतात. ओळखीच्याच जोरावर अनेक पदे मिरवतात. मग पुन्हा होतेच गत इथेही तशीच. म्हणतात ना गरज सरो वैद्य मरो. माणसाची प्रवृत्ती ही कायम अशीच. सार्थ साधताना मग कोणी येथे उरो अथवा मरो. कशाला करावी पर्वा कोणी कोणाची. जो तो समर्थ येथे घेण्या स्वतःची काळजी. पण इथे सत्ता मात्र सदैव आमची. आव असा जणू हाच वाहतो जगाची काळजी. मग पुन्हा कधी तरी अशीच जाणवते गरज. मग धुंडाळतो आम्ही जुन्या ओळखींना. देतो करून जाणीव मग त्यांनाही त्याची. अन उगाच येते उधाण जुन्याच विनोदांना. ओळख.... नसतेच कधी कोणी जपायची. खरं तर जपायची असतात नाती. नाती मैत्रीची निखळ मैत्रीची निस्वार्थी मैत्रीची. ओळख.... जपतात फक्त स्वार्थापुरती.

एक प्रवास...........

एक प्रवास मैत्रीचा.  जश्या हळुवार पावसाच्या सरींचा.  ती पावसाची सर अलगद येवुन जावी.  अन एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी..   एक प्रवास सहवासाचा.  जणु अलगद पडणार-या गारांचा.  न बोलताही बरच काही सांगणारा.  अन स्पर्श न करताही मनाला भिडणारा..   एक प्रवास शुन्याचा.  जणु हीमालयाशी भिडण्याचा.  शुन्यातुन नवे जग साकारणारा.  अन नव्या निर्मितीची चाहुल देणारा..   एक प्रवास जगण्याचा.  क्शणा क्शणाला माणुस घडवण्याचा.  हसता हसता रडवणारा.  अन रडवुन हळुच हसवणारा..   एक प्रवास प्रेमाचा.  भुरभुरणार-या दोन जिवांचा.  जिंकलो तर संसार मांडायचा.  अन हरलो तर नवीन वाटा शोधायच्या..   एक प्रवास प्रयत-नांचा.  सुख़ दुख़ातील नाजुक क्शणांचा.  अखंड घडवणार-या माणुसकीचा.  अन नवी उमेद देणार-या घडींचा..   एक प्रवास..  तुमच्या आमच्या आवडीचा.  साठवु म्हंटले तर साठवणींचा.  आठवु म्हंटले तर आठवणींचा.

असते मतलबी, दुनिया ही सारी,

असते मतलबी, दुनिया ही सारी, पण आपले, निराळे, असतातही काही, दैव ज्यांची, सतत परिक्षा, पाही, मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी, जिथे असते श्रद्धा आणि भक्ति, असे पुजनिय, असतात काही व्यक्ति, क्षणिक असते, अबोल्याची सक्ति, मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी, गौण ठरतात मैत्रीपुढे, रक्ताची नाती, कारन ही असते, सुंदर, निर्मळ नाती, मनास होत नाही, कधी येथे क्षिती, मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी, इथे शब्द असतात काही, जे लागतात जिव्हारी, विसर पडतो यांचा, इथे माणसं आपलीच सारी, आठवणींन्ने त्यांच्या, मनास येते नवी ऊभारी, मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते, न्यारी..

जमेल का आपली जोड़ी ..................?

जमेल का आपली जोड़ी ..................? कॉलेज चे गेट . झाली तिथे भेट . घुसलीस मनात थेट. देशील का मला डेट ....................? मी रोगी तू दवा. तू फुगा मी हवा . तू चुल मी तवा . सांग तुला मी हवा .....................? तू तपकीर मी चिमुट . तू साडी मी सूट. मी मोजा तू बूट. जमेल का आपल मेतकुट ........................? तू धाप मी छाती . मी शनि तू साडेसाती . मी भुत तू भानामती . जुलतिल का आपली नाती .......................? मी पेट्रोल तू गाड़ी . मी गवत तू काडी. मी विजार तू नाडी. जमेल का आपली जोड़ी ...........................?

आठवते का तुला

आठवते का तुला कॉलेज च्या जिन्या वरुन धडकून पडला होतास तू... 15 दिवस हात गळ्यात बांधून घेतला होतास तू.... सॉरी बोलण्या करता भेटला नाही तू ..... असा का वेडा तू... असा का वेडा तू... आठवते का तुला स्टडी टूर ला प्रपोज केले होतेस मला तू.. मी नाही बोलले म्हणून आजारी पडला होतास तू... हो.. बोलण्या करता लवकर मला भेटला नाही तू ..... असा का वेडा तू... असा का वेडा तू... आठवते का तुला रोज मला भेटण्या साठी घरी खोटे बोलायचा तू.... सुट्टी च्या दिवशी पण हॉस्टेल वर यायचस तू... मिस च्या शिव्या खायचास तू.... असा का वेडा तू... असा का वेडा तू... आठवते का तुला माज़ी वाट बघत पावसात भिजायचास तू.... लवकर आले नाही की राग वायचास तू... मी आणलेले गिफ्ट घेत मनात हसायचास तू... असा का वेडा तू... असा का वेडा तू... आठवते का तुला मी गावाला जाताना किती लेक्चर द्यायचास तू... पोहचले की फोन कर 100 वेळा बोलायचास तू.... टाटा करायला बस च्या मागे धवायचास तू.... असा का वेडा तू... असा का वेडा तू... आठवते का तुला रोज घरी फोन करायाचस तू... कधी येणार कधी भेटणार सारखा विचारायचास तू... आई पप्पा बरोबर बोलायला घाबरायचास तू... असा का वेडा ...

नसेल जर का, तुला भरवसा,

नसेल जर का, तुला भरवसा,  श्र्वासांची तू, झडती घे  रूप तुझेही, भरून उरले,  डोळ्यांची तू, झडती घे  दुसरा तिसरा, विचार नाही,  अविरत चिंतन, तुझेच गे  कधी अचानक, धाड टाकुनी,  स्वप्नांची तू, झडती घे  तेल, वात अन्‌, ज्योत दिव्याची,  तुझी आठवण, आणी मी  कसे तुला, समजावू वेडे,  प्राणांची तू, झडती घे  क्षणाक्षणावर, तुझाच ताबा,  तुझीच सत्ता, सभोवती  वाटल्यास मम, रोजनिशीच्या,  पानांची तू, झडती घे  कळेल तुजला, कळेल मजला,  भाकित अपुल्या, प्रीतीचे  तुझ्या नि माझ्या, तळहातांच्या,  रेषांची तू, झडती घे  या ह्रदयाचा, अथांग सागर,  नभी चंद्रमा, रूप तुझे  काठाची तू, झडती घे अन्‌,  लाटांची तू, झडती घे अजुन कोणता, हवा पुरावा  सांग `इलाही' सांग तुला  तुझ्याच रंगामध्ये रंगलो,  ग़ज़लांची तू, झडती घे

अजुन काय हवे

एकच चहा, तो पण कटींग..... एकच पिक्चर, तो पण tax फ़्रि.... एकच साद, ती पण मनापासुन... अजुन काय हवे असते मित्राकडुन? एकच कटाक्ष, तो पण हळुच.... एकच होकार, तो पण लाजुन... एकच स्पर्श, तो पण थरथरुन.... अजुन काय हवे असते प्रियेकडुन? एकच भुताची गोष्ट, ती पण रंगवून..... एकच श्रीखंडाची वडी, ती पण अर्धी तोडुन.... एकच जोरदार धपाटा, तो पण शिवी हासडून.... अजुन काय हवे असते आजीकडुन? एकच मायेची थाप, ती पण कुरवाळुन.... एकच गरम पोळी, ती पण तूप लावुन.... एकच आशिर्वाद, तो पण डोळ्यात आसवं आणुन.... अजुन काय हवे असते आईकडुन? एकच कठोर नकार स्वैराचाराला, तो पण ह्दयावर दगड ठेवून..... एकच सडेतोड उपदेश, तो पण घोग-या आवाजातून.... एकच नजर अभिमानाची, ती पण आपली प्रगती पाहुन.... अजुन कय हवे असते वडिलाकडुन? सगळ्यानी खुप दिलं, ते पण न मागून.... स्वर्गच जणू मला मिळाला, तो पण न मरुन.... फाटकी ही झोळी माझी, ती पण वाहिली भरुन... अजुन काय हवे आहे मला आयुष्याकडुन?

एक छानशी गोष्ट

एकदा स्वप्न आणि सत्य यांचे जोरदार भांडण झाले. विषय होता भविष्य घडविण्यात सर्वाधिक सहभाग कोणाचा. दोघे ही खुप भांडले, झगडले पण निर्णय काही होईना. शेवटी या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ते आपल्या मानसपित्याकडे- ब्र्म्हदेवाकडे गेले. ब्र्म्हदेवाने त्यांना सांगितले, "ज्या कोणाचे हात आभाळाला टेकतील आणि तरीही ज्याचे पाय जमिनीवर आसतील, त्याचा भविष्या घडविण्यात निर्णायक सहभाग असतो". दोघेही परत आले. स्वप्नाने आधी प्रयत्न केला. एकच उडीत त्याचे हात आभाळाला टेकले, पण त्याचे पाय जमिनीपसुन केंव्हाच उचलले गेले होते. सत्याने नंतर प्रयत्न केला. त्याचे पाय कायम जमिनीवर होते, पण त्याचे हात आभाळापर्यंत कधीच पोचु शकले नाहीत. दोघांनीही खुप प्रयत्न केले, पण दोघांपैकी कोणीच यशस्वी होउ शकले नाही. थकुन परत एकदा ते ब्रम्हदेवाकडे गेले, आणि या वेळेस ब्रम्हदेवाने त्यांना सांगितले, "भविष्य घडविण्यात सत्य, आणि स्वप्न या दोघांचाही सहभाग तितकाच मोलाचा असअतो. खर्‍या अर्थाने यशस्वी भविष्य घडवायचे असेल, तर स्वप्नाला सत्याच्या खांद्यावर उभे रहयला हवे!."