माणसाने समुद्र होण्यापेक्शा................

माणसाने समुद्र होण्यापेक्शा व्हावे किनारा..
लाटेसार्खे येणारे प्रत्येक दुखः घट्ट पाय रोऊन झेलणारा..
किनारयाला नसतातच कुणी मित्र वा वैरीही
त्याच्या नशीबात असतात फ़क्त लाटा अन
दर लाटेसोबत मिळणारा नविन आघात ऊघडतो अनुभवाच्या नविन वाटा...
त्यातली एखादी लाट असते हळुवारपणे येणारी
अलगद्पणे किनरयाला त्याची व्यथा विचारणारी..
पण त्या लाटेत गुन्तायचे नसते किनारयाने
कारण निमिशात त्याची स्वप्ने भन्गतात एका नविन आघाताने...
म्हणुनच म्हणतो समुद्र होण्यापेक्शा व्हावे किनारा
शेवटी तोच असतो सोबती दुखः प्रत्येक लाटेचे सामाऊन घेणारा...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

NOW TRY YOUR NAME AND SEE WHAT IT IS!!!!!!!!!!!!!

अजुन काय हवे