पोस्ट्स

2009 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मृत्यूसारखी सुंदर गोष्ट

वेडा म्हणाल मला पण मी वेडा मुळीच नाहि खरे सांगतो मित्रांणो मृत्यूसारखी सुंदर गोष्ट या जागात दुसरी कुठलीच नाही जिवन हे पुरतेच छळते याची जाणीव मात्र सरणावर जळताना होते भाई-बंधू सगे सगे-सोयरे असतात नुसते नावापुरते यमासारखा खरा मित्र जिवनात शोधूनहि सापडत नाहि मृत्यूसारखी सुंदर गोष्ट या जागात दुसरी कुठलीच नाही पाप-पुण्याची गणना येथे कर्म-कांडाच्या बळावर करतात केलेली पापे धुण्यासाठी मग श्री क्षेत्रे फ़िरतात पृथ्वीवर जेवढे पाप तेवढे प्रत्यक्ष नरकात सुद्धा नाहि आणी या नरकातुन सोडवणारा मृत्यूशिवाय दुसरा कुणीच नाहि मृत्यूसारखी सुंदर गोष्ट या जागात दुसरी कुठलीच नाही गरिब श्रीमंत, कोण मोठा कोण छोटा याच्या दरबा्री मात्र सर्वांना सारखीच जागा नश्वर या जगात अमर असा कुणीच नाहि साक्षात स्वर्ग सुद्धा पहायला मृत्यूशिवाय पर्याय नाहि म्हणुन म्हणतो मित्रांणो याला घाबरण्यासारख काहिच नाहि मृत्यूसारखी सुंदर गोष्ट या जागात दुसरी कुठलीच नाही

प्रेम करायचे होते………!!!

प्रेम करायचे होते तुझ्या निरागस त्या रुपावर मला पाहून मुरडलेल्या अन् नकट्या नाकावर……..! प्रेम करायचे होते तुझ्या नखरेल त्या रूसण्यावर निपक्षपाती नदी परी खळाळत्या हसण्या वर……! प्रेम करायचे होते त्या श्रावणी हीरवळी वर हळूच गाली खुलणारया तुझ्या मन मोहक खळी वर …….! प्रेम करायचे नवख्या दिन रात झुरण्या वर गुंतुन स्वप्नी तुझ्याच वेड्या परी फिरण्यावर…..! प्रेम करायचे होते निरपेक्ष नकारावर तरी मनात लपवलेल्या तुझ्या मूक होकरावर…….! हळूवार तुझे भाव सखी माझ्या साठी नसण्यावर तरी प्रेम कारयाचे होते तुझे 'माझे'च असण्या वर……..!!!

.....

समजावुनी व्यथेला समजावता न आले   मज दोन आसवाना हुल्कावता न आले   सर एक श्रावणाची आली........ निघून गेली....  माझ्या मुक्या तृशेला पण बोलता न आले ?   सुटला कधी न जो मी मज घातला उखाणा;  माझ्याच उत्तराला मज शोधता न आले !   चुकवुनही कसा हा चुकला न शब्द माझा   देणे मलाच माझे नाकारता न आले !   लपवीत गीत माझे पळ काढला तरीही   ह्रुदयातल्या विजाना झिडकारता न आले !   केले जरी खुलासे मीही नकोनकोसे,   जगने अखेर माझे मज टालता न आले

चारोळ्या............

मुलं हरवल्यावर बायका रड रड रडतात .. आणि ती भेटल्यावर त्यांना बडव बडव बडवतात..! घट्ट लावुन घेतलेली दारं बाहेर "वेल-कम"चं तोरण अहो, हे कसलं घर बंद करुन स्वागत करायचं धोरण..? मेकअपच्या ढगाआड तिचा चेहरा लपला होता सौंदर्याचा अट्टाहास तिने पैशामुळे जपला होता...! प्रेम कसे करावे याचे देखिल क्लासेस आहेत... फेल होणा-यांचा हातात दारुन भरलेले ग्लास आहेत..! तुझ्यावर प्रेम करतो हे तुला सांगायचं राहिलं हे सांगायच्या आधीच तुला दुस-याबरोबर फिरताना पाहिलं

अश्रु

एकदा डोळ्यातल्या एका अश्रुने दुस-याला विचारले...... 'ए आपण असे कसे रे ना रंग, ना रूप, नेहमीच चिडीचुप, आनंद झाला तरी डोळ्यातुन बाहेर, दु:खाच्या प्रसंगीही दुराव्याचा आहेर, कोणीच कसे नाही थांबवत आपल्याला, किनारा ही नाही साधा या पापण्याला............ दुस-यालाही मग जरा प्रश्न पडला, खुप विचार करून तो बोलला, रंग-रूप नसला तरी, चिडीचुप असलो जरी, आधार आपण भावनांचा, आदर राखतो वचनांचा, सान्त्वनांचे बोल आपण, अंतरीही खोल आपण, सुखात आपले येणे व्यक्तिपरत्वे, दु:खाच्या प्रसंगी आपलेच महत्व, आपल्याला नाही कोणी थांबवु शकत, बंधनात नाही कोणी बंधवु शकत, उद्रेक आपण मनातील वेदनांचा, नाजुक धागा वचनातील बंधनांचा, भावबंध ह्र्दयातील रुदनांचा, स्वरबद्ध झंकार तनातील स्पन्दनांचा , म्हणुनच, आपले बाहेर पड़णे भाग आहे, आपल्यामुलेच आज हे जग आहे. अशीच आपली कहाणी......... ऐकून ही अश्रुची वाणी अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी.........................

तुझ्या प्रेमात

तुझ्या प्रेमातच हसायचे होते, तुझ्या प्रेमासाठीच रडायचे.... ..........तुझ्या प्रेमातच जगायचे होते, ..........तुझ्या प्रेमासाठीच मारायचे...... तू आलीस अन्,,,हसण्याला; माझ्या जगण्याला अर्थ आले.... तू गेलीस अन् ,,,माझे रडणे; तुझ्यासाठी मारणेही व्यर्थ झाले..... ..........आता स्वतःशीच बोलतो, गप्पा मारतो; ..........स्वतःलाच समजावतो, ओरडतो; ..........कधी हस्तो, कधी खूप खूप रडतो; ..........तुझ्या शोधात इकडे-तिकडे भटकतो....... हरवलेल्या तुझ्या प्रेमाला; खूप शोधायचे प्रयत्न करतो..... आकाशाकडे बघून,,, त्या दैवाशीही भांडतो...... ..........तरीही तुझ्या आठवणींना,,, ..........जीवापाड मी जपते....... ..........अन्,,, तू नसलेल्या, ..........तुझ्याच आयुष्यात जगत जातो..... तू नसलेल्या,,,, ..........तुझ्याच आयुष्यात मी जगत जातो...

तुझी वाट धुक्यात हरावालिये ...........

तुझी वाट धुक्यात हरावालिये ........... मला खुप बोलायच होत, अन तुज्यासंगे चार पावल चालायच होते, तुजबरोबर आयुष्याच स्वप्न रंगवायाच होत, अन त्या रंगात मनसोक्त बगादयाचा होत , आजही वाटत वेळ नाही गेली, कदाचित , तुझ्यासाठी अजुन योग्य वेळ नाही आली , पण माझाच मी अंत पाहू किती? अन तुझ्या न परतून येण्याच्या वाटेवर उभी राहू किती? माझ जगन हेच माझ्यासाठी एक कोड झाले, अन म्हनुनच तुझ नाव निघाल्यावर chidan हे फक्त निमित्त झालय, का विचार करते तुझा , हा विचार त्रास देतोय, तू भावनांशी खेलालास माझ्या, हे समजावून घेन अवघड जातय , कोनाच चुकल? आणि काय चुकल? हां विचारच सोडलाय, माझिया मानत मीच आज दुफलिचा डाव मांडलाय, जगासमोर मी खुशिच ढोंग करते, कस सांगु तुला एकांतात मी किती आक्रन्दते, तू काय विचार करत असशील ? तू मजसम तिलतिल टूटल असशील? हा प्रश्नच व्यर्थ, अन त्याच उत्तरही व्यर्थ, माहित आहे .....तुझी वाट धुक्यात हरावालिये, अन ........माझ्यासाठी ती शोधन तूच अवघड बनावालिये ............ माझ्यासाठी ती शोधन तूच अवघड बनावालिये ............ माझ्यासाठी ती शोधन तूच अवघड बनावालिये ............

. सुख म्हणे:

पाखरे परत येतील साजं टळून गेल्यावर मेघ दाटून येतील उंन पोळून गेल्यावर सरी धावून येतील रानं जळून गेल्यावर सुखही परत येईल दु:खं छ्ळून गेल्यावर. होतील मार्ग मोकळे वळणं टळून गेल्यावर शब्द टोचतील मनाला ते बोलून गेल्यावर भिजतील डोळे तुझे, माझे सुकून गेल्यावर पुन्हां तु ही परत येशील मी दूर गेल्यावर. झोप धावून येईल स्वप्नं जळून गेल्यावर कळ्तील तुला चुका पण मी माफ़ केल्यावर कळेल प्रेम तुला विरहात मन पिळून गेल्यावर तुही धावून येशील मी राखेत मिळून गेल्यावर. आठवण माझीही येईल मी विसरून गेल्यावर पुन्हां तु शोधशील खुणा राखही उडून गेल्यावर तुझ्याही डोळ्यात आसवे ओघळतील कधी पण माझ्या कविता तुझ्यापुढे रडून गेल्यावर नाव बुडण्याआधी किनारा पाहून घे जो नेईल नदीपार असा सहारा शोधुन घे माझा मृत्यू इथेच लिहीलाय याच सागरात मला शेवटाचा एकदा मिठीत सामावुन घे. जेवढं रडायचं आहे आज रडून घे ज्या शपता सोडायच्या त्या सोडून घे आठवणीशीवाय काहीच नाही माझ्याकडे आणखी काही हवं असेल तर मागुन घे आज तुझी प्रत्येक इच्छा पुर्ण करुन घे आज शेवटच मला डोळे भरुन पाहून घे

आपल्या जवळ जे नाही

आपल्या जवळ जे नाही त्याचीच मानवी मनाला ओढ असते सर्वच मनं सारखी घडत नसतात म्हणून वास्तविकतेला स्वप्नाची जोड असते ......... फुले शिकवतात......, गुलाब सांगतो, येता जाता रडायचं नसतं, काट्यात सुध्दा हसायचं असतं; रात रानी म्हणते, अंधाराला घाबरायचं नसतं, काळोखात ही फुलायचं असतं; सदाफुली सांगते, रुसुन रुसुन रहायचं नसतं, हसुन हसुन हसायचं असतं; बकुळी म्हणते, सवळ्या रंगाने हिरमुसायचं नसतं, गुनाच्या गंधाने जिंकायचं असतं; मोगरा म्हणतो, स्वत:चा बडेजावपणा सांगायचा नसतो, सदगुनांचा सुगंध मैलवरुन ही येतो; कमळ म्हणतो, संकटात चिखलात बुडायचं नसतं, संकटांना बुडवुन फुलायचं असतं

चारोळ्या

का होतं मन असं हळवं का होतं मन असं हळवं कोणाच्या तरी आठवणीने ? एक एक क्षण का वाटे युगासमान, त्याच्या दूर जाण्याने ? भेटीनंतरही का ..... भेटण्याची आस असते ? त्याच्याच गोड स्वप्नांमध्ये का रात्र सारी हरवते ? त्याने फक्त आपल्यालाच पहावं, आपल्याशीच बोलावं.. असं काही वाटू लागतं प्रत्येक छोटी गोष्ट ही त्यालाच सांगावी म्हणून मन आतुरतं कळलं का तुम्हाला, अचानक असं वेड्यासारखं का होतं ? दुसरं काही नाही ......... यालाच तर म्हणतात " प्रेमात पडणं "

अधुरे प्रेम

आपणच तोडायला हवेत आता सारे बंध दूर सारायला हवा हळव्या स्मृतींचा गंध अलगद सोडवून टाकू प्रेमाचे हे रेशीमधागे वळून पहायलाही काही ठेवायचं नाही मागे आपणच रेखाटलेल्या रांगोळीचे रंग आपणच पुसायचे पापण्यांत अश्रू दडवून जगासमोर हसायचे आपणच विणलेल्या स्वप्नांना आपणच देऊ मूठ्माती या जन्मीचं राहिलेलं प्रेम राखून ठेवू पुढच्या जन्मासाठी

मनातल्या मनात

सर्वांनी सांगितलं तुझं मन तिच्यापुढे व्यक्त कर डोळ्यांनी नव्हे तर शब्दांनी सारं स्पष्ट कर ||१|| सल्ला आवडला माझ्या मनाला उचलला फोन, तिला कधी भेटायचं विचारायला नंबर तिचा फिरवला मनाचा समतोअल बिघडला खरंच का तु सांगु शकशील तिच्या मनांत नसलं तर उगाच चांगली मैत्रीण गमावशील मनाची ही बाजु मनालाच पटली एक बेल तिच्या फोनची वाजली नकाराची घंटा माझ्या मनाची खणखणली दुसरी बेल वाजण्याचे वेळच येऊ नाही दिली ||२|| असंच का तु जगशील सांगितल्याशिवाय मानातलं तिला कसं तु समजावशील? भावना तुझ्या सा-या मनातल्या सांगणं तुला नकार या पैकी एकच उत्तर तुझे आहे ||३|| मनाचं द्वंद्व माझ्या आत चालू झालं सकारात्मक - नकारात्मक भांडण सुरु झालं लढाई फारच लांब रंगली दोन्ही पक्षांच्या विचारांची हानी मात्र झाली सरतेशेवटी सकारात्मकतेची बाजु जिंकली उचलुन फोन करावा हीच बाजु मनाला पटली ||४|| उशीर करणे योग्य नव्हते फोन करणे जरुरी होते सवयीप्रमाणे बोटे बटणांवर फिरली लगेचच बेल होनची खणखणली हॅलो म्हणुन समोरुन कुणीतरी बोलमं आवाज ओळखीचा, म्हणुन हाय म्हटलं कुशल मंगल सारं विचारलं विषय कसा काढु हेच नाही...

आयुष्य

आज म्हटल आयुष्य विणायला घेउया जमतय का ते बघुया वाटल अगदी सोप असेल रंगसंगती जमून आली की आयुष्यही सुंदर दिसेल प्रश्न पडला धागे कोणकोणते घ्यायचे एक दोनच की सगळेच वापरायचे मग ठरवल फक्त छान छानच धागे घेऊ एक काय दोन काय सगळेच एकमेकांत विणु सुरुवात केली वात्स्ल्याच्या धाग्याने धागा होता फार उबदार आणि मुलायम म्हटल छान आहे हा धागा धाग्याने ह्या विण राहील कायम मग घेतला मैत्रीचा धागा म्हणता म्हणता ब-याच भरल्या जागा थोड थोड आयुष्य आकार घेऊ लागलेल पण अजुनही बरचस विणायच बाकी रहिलेल एक एक धागा आशेचा, सुखाचा आणि आनंदाचा घेतला प्रत्येक धाग्यात तो आपसुकच गुंफत गेला हळू हळू विण घट्ट होत होती तरीदेखील कसली तरी कमी मात्र होती मग घेतला एक नाजुक प्रेमाचा धागा धागा होता सुंदर आणि रेशमी धाग्याने त्या आयुष्याला अर्थ आला लागुनी एक एक घेतला धागा यशाचा, कीर्तीचा आणि अस्तित्वाचा आयुष्याला त्यामुळे एक नवा उद्देश्य मिळाला सगळेच धागे छान, सुंदर आणि प्रसन्न होते तरीदेखील त्यांच्यातल्या एकसारखीपणाने मन मात्र खिन्न होते थोड़े धागे पडले होते निवांत बसून असेच म्हटल बघुया तरी ह्यांच्यामुळे आ...

तर..????

वाटणारी प्रत्येक गोष्ट शब्दांत मांडता आली तर... मनातली प्रत्येक भावना बोलुन दाखवता आली तर... तुझ्यावर प्रेम आहे, हे सहज सांगता आलं तर.. तुझ्याशिवाय जगुच शकत नाही, हे पटवुन देता आलं तर... तुझी खुप आठवण येते हे विसरुन जाता अलं तर.... तुझ्या पलिकडे सुध्दा आहे हे जाणुन घेता आलं तर... माझं सुध्दा अस्तित्व आहे, हे समजुन घेता आलं तर... तु फक्त माझीच आहेस, हे तुला न सांगता कळलं तर.. तु अशिच जवळ रहा, हे स्पर्शानं सांगता आलं तर... तु जवळ नसतेस तेंव्हा, तुझा स्पर्श जाणता आला तर.. किती बरं होईल, जर मन वाचता अलं तर... शब्दांपलिकडलं काही तरीनजरेनच जाणता आलं तर... हे सगळेच "तर" नाहीसे होतील एकदाच म्हणालीस जर... "मी सुखी होईन, जर तु माझाच झालास तर..!

आरसा..

अनेक नजरांत.अनेक मनांत.. मी वेगवेगळा किती..! अरे देवा! ह्या धरतीवर.. मी रूपांत नेमका किती..! कुणाकुणाला कसेकसे.. माझे हे रुप ते भासे.. स्वतःस मजला माझी... अस्पष्ट आकृती दिसे.. समोरील मायाजालात या.. मी स्वतःस ओळखू कसा..? तो मीच खरा आहे का..? जो हा दाखवतोय आरसा........!!!

असंही प्रेम असतं!!

असंही प्रेम असतं!! अशाच एका संध्याकाळी,मन खुप जास्तच उदास झालं होतं.... काय करु? काहीच सुचतं नव्हतं.... उगाच मनात विचार आला, चल स्मशानात जाऊयात.... गेलो मग स्मशानात एकटाच!बसलो एका थडग्याजवळ जाऊन.... थडगे ताजे वाटत होते....मनात कुतूहल जागले.... थडग्यावरचे नाव वाचले...' महनाज़ खान ' '१९८६-२००७'... म्हणजे माझ्याच वयाची असेल! कसं ग्रासलं असेल मृत्युने तिला?काय कारण असेल? आजार? खून? का... का बाळंतपणात दगावली असेल ती? मनात उगाच प्रश्नांचे काहूर उठले... तेव्हढ्यात एक मुलगा त्या थडग्यावर फुले ठेवण्यासाठी आला.... मी त्याला विचारले ' तू भाऊ का तिचा?' तो म्हणाला 'नाही, मी तो, ज्याच्यासाठी तिने आत्महत्या केली!' मी विचारले ' आत्महत्येचं कारण?' तो म्हणाला ' मला ब्लड कॅन्सर झालाय! २ आठवडे उरले आहेत फक्त!' मी चकीत झालो! विचारले ' मग तिने आत्महत्या का केली? तू जिवंत असतानाही?' तो म्हणाला ' ती माझ्या स्वागताच्या तयारीसाठी पुढे गेली आहे!'

आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...  बाकी सारे आकार, उकार, होकार, नकार...  मागे पडत चाललेल्या स्टेशनांसारखे  मागे मागे जात जात पुसटत चालले आहेत...  पुसत जावेत ढगांचे आकार  आणि उरावं एकसंध आभाळ, तसा भूतकाळ  त्याच्या छातीवर गवताची हिरवीगार कुरणं,  भरून आलेली गाफील गाणी, काळेसावळे ढग  आणि पश्चिमेच्या वक्षाकडे रोखलेले बाणाकृतीतील बगळे  आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...   बंध रेशमी तुझ्यासवे जे जुळले  अन् क्षितिजावर रंग नवे अवतरले  घन दाटताच एका क्षणात हे रंगबंध विस्कटले...तुटले....   विसरत चाललोय... नावेतून उतरताना आधारासाठी धरलेले हात  विसरत चाललोय होडीची मनोगते, सरोवराचे बहाणे,  वा नावेला नेमका धक्का देणारी ती अज्ञात लाट  ती लाट तर तेव्हाच पुसली... मनातल्या इच्छेसारखी  सरोवर मात्र अजूनही तिथेच...  पण त्याच्याही पाण्याची वाफ किमान चारदा तरी आभाळाला भिडून आलेली  आता तर लाटा नव्हे, पाणी सुद्धा नवंय कदाचित  पण तरीही जुन्याच नावाने सरोवराला ओळखतायत सगळे......
जाते म्हणतेस हरकत नाही,  कढत अश्रु पाहुन जा, नाते तोडतेस हरकत नाही,  विझता श्वास पाहुन जा, जाणुन सारे संपवताना,  हिच एवढी विनंती, हसते आहेस हरकत नाही,  बुडती नाव पाहुन जा..

अबोल प्रेम

हे फक्त माझ्याचसोबत नेहमी असंच घडणार आहे? तुझ्याबरोबरची प्रत्येक भेट 'ते' न बोलताच संपणार आहे? भेट-वेळ रोजची ठरलेलीच तरी अजून काय ठरणार आहे? बोलायचं पटकन पण वेडं मन त्याचाही मुहुर्त पाहणार आहे ! भेटतो तेव्हाच माहित असतं निघायची वेळ येणार आहे पटकन विचारावा प्रश्न हवासा तर शब्द ओठीच अडणार आहे ! मी न विचारताच तू काय हवं ते उत्तर देणार आहे? हे पुरतं कळतंय तरीही तोंड माझं का बोलणार आहे? न बोलता बोललेले शब्द तुला वेड्याला कळणार आहे? मी बोलले/न बोलले तरी गप्पच नेहमीसारखा तू राहणार आहे ! भावभावना समजून घेणं सगळंसगळं थांबणार आहे उष्ट्या कुल्फीची चव मात्र जिभेवरती रेंगाळणार आहे स्वप्न माझं हे संपलं तरीही मनात तूच उरणार आहे तुझ्यात मी नसले तरी माझ्यात तूच सापडणार आहे ! पहिला पाऊस पडतो तेंव्हा एकच काम करायचं ... हातातली कामं टाकुन देउन पावसात जाऊन भिजायचं ! आपल्या अंगावर झेलून घ्यायच्या कोसळणार् या धारा श्वासांमध्ये भरून घ्यायचा सळाळणारा वारा कानांमधे साठवुन घ्यायचे गडगडणारे मेघ डोळ्यांमध्ये भरुन घ्यायची सौदामिनीची रेघ पावसाबरोबर पाऊस बनून नाच नाच नाचायचं अंगणामधे , मोगर् यापाशी तळं होऊन स...

एक कळी.......

अशाच एका सकाळी  सहज भेटली एक कळी.......   कळी खूप नाजूक होती.......  तरी फुलावे वाटे तिला सर्वांसाठी.......   कधी वारा तिज त्रास देई.......  लटपटे शरीर पण तशीच उभी राही.......   पाऊस खुपच कधी वेगाने बरसू पाही.......  अस्तित्व टिकवायची धडपड सारे जग पाही.......   तशीच फुलू पाही ती जोमाने.......  जरी झाला व्याकुळ ह्या उंन्हाने.......   देव नेहमीच तिची परीक्षा घेई.......  का असे ?तिने कधी प्रश्न केला नाही.......   नेहमीच ती आघात सोसू पाही.......  तरी खोटे हास्य नेहमी ओठतून वाही.......   प्रवास ना माहीत तिज तिच्या आयुष्याचा.......  तरी एक संघर्ष सगळी नाती टिकवण्याचा.......   सुकली जरी ती,तरी नवा जन्म घेईल.......  असंख्य वादळे पुन्हा झेलेल.......   अस्तित्व स्वताचे टिकवून ठेवेल......  एक दिवस तीचाच येईल.......

पाऊस

थांब जरा तू बरसू नकोस ती येणार आहे तु ही तरासू नकोस तू बरासलस तर ती अडकून बसेल तू थांबावा म्हणून माझे पत्र ती हातात घट्ट पकडून बसेल काही क्षण तुझ्या थांबण्याची .. मग ती…ती वाट पाहील निघेल मग पावसात ती सावरत सावरत ती माझ्या कडे येईल ती आल्यावर मग शांतच राहील कदाचित ओढणिने चेहरा पुसत, थंडीने कूडकुडत म्हणेल “माफ कर.मला उशीर झाला मी निघालेच होते पण पाऊस आला” मी माझा जॅकेट तिला देईल, ती म्हणेल नको रे मी ठीक आहे. हळूच मी तिचा हात हातात घेईल, मी म्हणेल या बरसनाया पावसाप्रमाणे तू माझ जिवनात सुख होऊन बरसशील ? तिला खूप आनंद होईल.ती लाजेल ही थोडीशी पण हळूच डोळ्यात तिच्या आसवे येतील कदाचित, घरचे काय म्हणतील हा विचार तिला पडेल. माझे जॅकेट मला परत करून. निशब्द होऊन निघून जाईल ती निशब्द मला करून तोडून जाईल ती “”तू थांबू नको रे पावसा तू बरसतच रहा ती नाही आली तरी चालेल मला तिच्या नकारा पेक्षा … ती तुझ्या मूळे नाही आली असे खोट खोट.. मनाला समजावन आवडेल मला….”" तू थांबू नको रे तू बरसतच रहा ..........

Tu......

काय चाललंय तरी काय हे कळायला मार्ग असावा लागतो .... आजकाल तर होश यायला किंवा बेहोश व्हायला तुझा चेहरा दिसावा लागतो .... ए, खरंच तुझ्या आठवणीत मला वेड लागेल काय? आणि माला वेड लागलेलं तुला चालेल काय? तुझ्या आठवांना हेवा वाटावा असं काही करून जा नेहमीच तुझी आठवण येते कधी तू ही येउन जा ... तुझ्या आठवांचा लळा जपतो आहे मनापासून एक आसवांचा झरा झरतो आहे मनापासून .....

असाच आहे मी...

असाच आहे मी... चांदण्यांबरोबर रात्री गप्पा मारणारा वाऱ्याबरोबर दुर फिरायला जाणारा हिरव्या सावलीत कोठेतरी रमलेला असाच आहे मी कवितेतल्या चारओळीत कोठेतरी हरवलेला मला मी सांगू कसा वाटतो थेंब थेंब जसा रोज साठतो शब्दास शब्द, हाकेस हाक, कधी नि:स्तब्ध राहतो जीवनपूजेचा रोज असा मी प्रसाद वाटतो टाळीला जेव्हा टाळीही मी देतो खांद्यालाही खांदा सहज मी जुळवतो, कमवून मित्र अनेक, कधी एक गमवतो तेव्हा ओढ्यात बसून डबक्यात पाहतो मला मी सांगू असा वाटतो ... कधी कुणी भावनांचा वसंतही देतो तरी पालवी न फुटता, मी मैत्रीतच खुजतो कधी डोळ्यात नकार साचतोच फार तेव्हा बरसूनी, इंद्रधनु दिसल्याचा आव आणतो मला मी सांगू असा वाटतो ... रोज स्वप्नांच्या यादीसवे मी निघतो काही गाठतो,काही खोडतो,काही पुन्हा लिहीतो आणि सायंकाळी मात्र मी एकटाच उरतो.... अरे कारण तो एकांतही मला उपभोगायचा असतो...आणि काय... आणि खरच असाच आहे मी...

म्हणून तर बघा - I LOVE YOU ...

कोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधी बदलून जातं आपलं सारं जगच त्यांच्याभोवती फिरू लागतं जिवंत राहणं आणि एक एक क्षण जगणं यातला फरक समजू लागतो नाही नाही म्हणता आपणही प्रेमात पडू लागतो कधी हसणं विसरून गेलो तर ते हसायला शिकवतात जीवन हे खऱ्या अर्थाने जगायला शिकवतात पण एक दिवस जेव्हा ते दूर निघून जातात.... आपलं आयुष्यच अर्थशून्य वाटू लागतं त्यांच्या गोड आठवणींमधे वेडं मन झुरू लागतं कारण प्रत्येकालाच गरज असते एका साथीदाराची, प्रत्येक क्षणाला प्रीतीच्या रंगात रंगवण्यासाठी त्याच्या गोड गुलाबी स्वप्नात हरवण्यासाठी म्हणूनच ........ असेल जर कोणी असं खास तुमच्याजवळ जाऊ देऊ नका त्यांना कधी दूर एकदा जवळ घेऊन म्हणून तर बघा " I LOVE YOU "
इमेज

कधीतरी वाटतं....

कधीतरी वाटतं कुणीतरी सोबत असावं  माझ्याच विचारांनी दिवसाची सुरवात करणारं,   कधीतरी वाटतं कुणीतरी सोबत असावं  होता विरह थोडातरी काळजी घे स्वतःची म्हणणारं  हे सारं बोलताना नकळतपणे दोन आसु गाळणारं   कुणीतरी असावं माझ्या परतीच्या वाटेवर डोळे लावुन बसणारं   काहीही झालंतरी माझा फोन कट न करणारं  आणि बोलणे कुणालाही समजणारही नाही इतक्या सहजतेने बोलणारं   कुणीतरी असावं अश्या माझ्याशी तासंतास गप्पा मारणारं  दिवसभरं माझ्या फोनची आतुरतेने वाट पाहणारं  फोन आल्यावर माझ्यावरं लटके लटके रागवणारं   कुणीतरी असावं मी समजावल्यावर मात्र नचुकता सॉरी म्हणणारं  सुट्टीच्या दिवशी भेटायला यायला सांगणारं  थोडासा तरी उशीर झाला येण्यासाठी तर येरझारया घालणारं   कुणीतरी असावं सोबत आतुरतेने माझी वाटं पाहणारं  माझ्या डोळ्यांतील भाव बोलले नाही तरी जाणणारं  एखाध्या नाजुक भावक्षणी डोळ्यातुन पाणी गाळणारं

मराठी माणसा आता तरी तू मराठीतून बोल...

इंग्रजीच्या नादापाई झाला मराठीचा डब्बा गोल मराठी माणसा आता तरी तू मराठीतून बोल... इंग्रजीच्या पेपरात होऊन जाते वर्ग सारा पास पण मराठीचा पोरगा होतो मराठीत नापास... प्रेम करतो तुझ्याशी म्हटले की पोरगी समजते हेंबाड्या अन आय लव यु म्हटल्यावर मनात मारते उड्या... माय झाली मॉम आणि बाप झाला आता डयाड रेव्ह पार्टीत नाचून श्यान पोर झाली मॅड... भांडण करते बायको घरात बाबुला इंग्रजी शाळेत टाका मराठी माणसापासून आहे खरा मराठी भाषेला धोका... मराठी इसरत चालल शाळेतले शिक्षण मराठी औक्सीजनवर अन चालू आहे इंग्रजीचे रक्षण... ज्ञानोबा तुकोबाची अभंगवाणी, आठवा मराठीचा गोडवा मराठी माणसाचे नवीन वर्ष म्हणजे असतो गुडी पाडवा... सावध व्हा मित्रहो, जपा मायबोली मराठी मराठीतूनच बोला सारे मराठी रक्षणासाठी...!!!

दळभद्री विचार

मुंबईतला सागरी पूल तर दोन्ही कॉंग्रेसला जोडू लागला. रस्त्यावरच्या भिकार्‍यांना मात्र नवाच प्रश्न पडू लागला. नामकरणाच्या राजकारणाशिवाय राजकारण्यांना जगता येणार नाही ! भिकार्‍यांचे दु:ख हे की, त्या पुलाखाली बसून भिक मागता येणार नाही !!

बघ तिला सांगुन!

म्हणुनच म्हणतो एकदातरी.... रोज रोज देशील एसएमएस तू पाठवून आतुरतेने हसत तो काढेल ती वाचून मेमरी फूल झाली की टाकेल डिलीट करून म्हणुनच म्हणतो एकदातरी बघ तिला सांगुन! तुझा एक एक गुलाब ठेवील ती साठवून एक दिवस येईल गुलकंदाची बरनी घेवून लग्न ठरते म्हणत ती जाईल ती निघून म्हणुनच म्हणतो एकदातरी बघ तिला सांगुन! किती दिवस थांबणार तू बोलाल्यावाचुन एक दिवस येशील एकट तिला गाठून रडताच निघेल ती पत्रिका हातात देऊन म्हणुनच म्हणतो एकदातरी बघ तिला सांगुन! जाशील लग्नाला शेवटच बघायला म्हणुन मारशील तू अक्षता नवरयाला फेकून बघशील तेव्हाही तिला चोरून चोरून म्हणुनच म्हणतो एकदातरी बघ तिला सांगुन! कधी तरी दिसशील तिला रस्त्यावरून थांबवेल तेव्हा तुला ती एक हाक मारून विसराशिर तू स्वतालाच तीच बाळ पाहून तीच म्हणेल तेव्हा तुला "एकदातरी...बघायच होतस मला सांगुन!!...."

ती.....

ती चालली होती, एकटीच एकटिच्या वाटेने..... कुणाचीतरी सोबत मिळेल या वेडया आशेने...... तसा डोक्यावरचा सुर्य होताच तिच्या साथीला..... जणु तो साथ देत होता तिच्या संथ गतीला....... तिला भान न होते तिच्याही अस्तित्वाचे......... चटकेही लागत नव्हते पाया खालच्या विस्तवाचे...... अचानक डोक्यावरचा सुर्य ढगाआड जाउ लागला..... भर दिवसा हवेत मंद वारा वाहु लागला..... तिच्या शांत चेहरयावर हसु उमटले...... गुढ प्रकृतीचे जणु फक्त तिलाच उमगले...... आतुर होऊन ती ढगाकडे पाहु लागली....... पावसाच्या नुसत्या कल्पनेने ती प्रफ़ुल्लीत होऊ लागली..... तिला वाटल पावसाच्या आगणित सरी तिच्यावर कोसळणार..... अन.. मतीचा सुगंध तिच्या श्वासात मिसळानार...... पन....तो मात्र तिला नुसतीच आशा दाखऊन परतला..... ढगाआड लपलेला सुर्य गालतल्या गालत हसला...... डोळयातुन तिच्या पाण्याचे अनेक थेंब ओघळले....... त्या थेंबाणी मुळे जनु सारे आसमंत उजळले.... ती शुन्य नजरेने तिच्या वाटेकडे पाहु लागली....... थकलेली पाऊले पुन्हा ऊचलु लागली.... अन...ति पुन्हा एकटिच चालु लागली

मिस कॉल

थांबव ग राणी तुझ मिस कॉल देण, मोबाइल च बिल झालय आता ग जीवघेण, मिस कॉल देण्याची तुला हौस ग न्यारी, बिल मात्र पडतय माझ्या ग पादरी.... अलार्मच्या आधी ही येतो तुझा मिस कॉल, माझ्याही आधी होते माझ्या मोबाइलची सकाळ, कॉल करायला राणी तुला कधी जमतच नाही, चुकून केलाच कधीतर ५ मिनिटापेक्षा जास्त बोलायच नाही, मी कॉल केल्यावरमात्र तुला तासनतास बोलावास वाटत, तुझ बोलन वाढलेल पाहून काळीज्ञ माझ फाटत(धडधडत) तुझ हे मिस कॉल देण आता रोजचच झालय, माझाही तुला कॉल करण मग साहजिकच झालय, पण .... मी ही आता ठरवलय तुला कॉल नाही करायच, आलाच तुझा मिस कॉल तर तुलाच परत मिस कॉल द्यायच, तुझा कॉल येई पर्यंत तुला मिस कॉल देत रहायच, आणि तू कॉल केल्यानंतर मुद्दामहुन जास्त वेळ बोलायच, तुलाही कलुदे आता कॉल करण्याच दु:ख, मलाही मिलु दे मग थोडस मिस कॉल देण्याच सुख

Nathuram godse & Veer savarkar

इमेज

स्वप्न

आज प्रथमच तिला पहिल मन वेडावुनच गेल, एकाच नजरेत तिने मला पुरत घायाळ केल, गुलाबी गाल... हरीणिची ती चाल मादक अशी तिची अदा, काय सांगू मित्रांनो... मी झालोय तिच्यावर फ़िदा, एकटक पाहत बसलो विसरून सर्व भान, मिळताच नजरेला नजर तिने खाली घातली मान, तिच्याजवळ बोलायची इच्छा खुप झाली, कसलाही विचार न करता सरळ तिचीच वाट धरली, तीही थोडीशी पुढे आली कदाचित तिलाही काही बोलायच होत, काय सांगू मित्रांनो.... नेमक तेव्हाच आईने जागवल होत...

मनातले शब्द मनातच राहून गेले..

मनातले शब्द मनातच राहून गेले... तीला बोलावलं भेटायला, ठरवलं सारे सांगून टाकायचे, पण ती आली मैत्रिणी सोबत, अन काही बोलताच नाही आले, आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले... हिम्मत साठवली आणि केले तीला SMS, पण अर्धवटच वाचून ते Delete तीने केले, आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले... लिहित बसलो रात्रभर, वाटल सांगावं कवितेतून तीला सारं, पण ती समोर येता सारे शब्दच विसरून गेले, आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले... भेटली एकटी बस-स्टॉपवर ती, वाटलं संधी चांगली आहे, पण अचनक तिने "हा मझा बॉय-फ्रेंड" असे इंट्रोड्युस "त्याला" केले, आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले... तरी वाटलं डोळ्यातले अश्रू सांगतील तिला सारं, पण ती येई पर्यंत ते ही पावसाच्या पाण्यात वाहून गेले, आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले..

गांधीजी Vs सावरकर

गांधीजी - भारतवासीयांनो शत्रूवर प्रेम करा व त्याच्यावर विश्वास ठेवा. सावरकर - शत्रूवर प्रेम अथवा विश्वास ठेवला जात नाही. गांधीजी - अहिंसेचा मार्ग स्वीकारा. कोणी एका गालावर थोबाडीत मारली तर दुसरा गाल पुढे करा. सावरकर - स्वरक्षण करणे म्हणजे हिंसा नव्हे. मूर्ख हिंदूंनो, एक गळा कापला तर कापायला दुसरा गळाच उरत नाही. गांधीजी - मी पण एक हिंदू आहे व हिंदूंचे सर्व देव शांतीचा संदेश देतात. सावरकर - तुम्ही पोकळ हिंदू आहात. रामाच्या हातात धनुष्यबाण व कृष्णाच्या हातात सुदर्शन चक्र आहे. सज्जनांच्या रक्षणासाठी देवांनाही हाती शस्त्र घ्यावे लागते. गांधीजी - हाती शस्त्र घेणे कधीही वाईट होय. शत्रूशी लढायचे असेल तर त्याच्या तत्त्वांशी लढा. सावरकर - युद्धात तत्त्व नव्हे तर तलवारी टिकतात व जिंकतात. राष्ट्राच्या सीमा या फक्त तलवारीनेच आखता येतात, तत्त्वांनी नव्हे. गांधीजी - हृदयपरिवर्तनावर विश्वास ठेवा. शत्रूचे मन जिंका. सावरकर - ज्याने आपल्याला मारून टाकायचे ठरवले आहे त्याचे मन जिंकता येत नाही. हे हिंदूंनो, अफझलखानाचे हृदय परिवर्तन करता येत नाही, त्याचे ह्यदय फोडावे लागते.

इतकी नाजुक

इतकी नाजुक इतकी अल्लद ............... इतकी नाजुक इतकी अल्लद ........ फ़ुलपाखराहुन अलवार ............ चालु बघत नकळत होते वारया वरती अलगद स्वार इतकी नाजुक ...... निजल्या देही गव्हाषातुनी चंद्र किरण ते पडता चार लख्खगोरटी रापुन झाली रात्रीत एका सावळ नार इतकी नाजुक जरा तिचे मी जोर देउनी लिहीता नाव दावत आली दुसरया दिवशी अंगाअंगावर हळवे घाव इतकी नाजुक ..... इतकी नाजुक इतकी सुंदर दर्पण देखील खुळावतो ...... ती गेल्यावरही तो क्शणभर प्रतिबिंबाला धरु बघतो ... इतकी नाजुक कि जेव्हा ती पावसात जाऊ बघते ....... भिती वाटते कारण जळात साखर क्शणात विरघळते . इतकी नाजुक कि आता तर स्मरणाचे ही भय वाटे ...... नको रुताया फ़ुलास असल्या माझ्या जगण्यातील काटे ----- संदिप खरे

कणा

ओळखलत का सर मला - पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहुन ; गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहुन माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी - बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विझली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर , आता लढलो आहे पडकी भिंत बांधतो आहे . चिखलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला ’ पॆसे नको सर , जरा एकटेपणा वाटला ’ मोडून पडला संसार तरी मोडला नाही ’ कणा ’, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा ....         कुसुमाग्रज.......